| सुतारवाडी | वार्ताहर |
गेल्या अनेक वर्षापासून गणेश भक्तांना आपल्या गावाकडे येताना आणि परतीचा प्रवास करताना रस्त्यावर पडलेल्या प्रचंड प्रमाणावर अशा खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्यामुळे हजारो गणेश भक्तांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. मुंबई-गोवा मार्गावर पडलेले खड्डे मोजणे अशक्य झाले आहेत.
यावर्षी गोविंदा तसेच गणेशोत्सव हे सण निर्बंधमुक्त करण्यात आले असून, गणेशभक्तांसाठी ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली असून, टोल माफही केले आहे. 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे सर्वत्र आगमन होणार आहे. त्या अगोदर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा सूतोवाच शासनाने केली आहे. त्यामुळे जीवघेण्या प्रवासातून काही काळ प्रवाशांची, गणेशभक्तांची असंख्य चालकाची सुटका होणार आहे.