शेकाप नेते पंडित पाटील यांचा सवाल
| रोहा | प्रतिनिधी |
सध्या राज्यात हनुमान चालिसावरुन राजकारण केले जात आहे. आम्हीच खरे हिंदुत्ववादी हे सांगण्यासाठी अहमहमिका लागली आहे. पण, या मंडळींनी किती मंदिरांची उभारणी केली आहे, असा रोखठोक सवाल शेकाप नेते पंडित पाटील यांनी महादेवखार येथील हनुमान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात केला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच नारायण गायकर, हेमंत ठाकूर, विनायक धामणे, जितेंद्र जोशी, गोपीनाथ गंभे, लियाकत खोत, आत्माराम कासार, शशिकांत कडू, संदेश विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
महादेवखार येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाचा पाया स्व. गोवर्धन कांडणेकर यांनी रचला. परंतु, त्यांच्या अकाली निधनानंतर यशवंत शिंदे यांनी आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेत या मंदिराच्या कळसापर्यंतचे काम पूर्णत्वास नेले याचा मनापासून आनंद आहे. महादेवखार हा शेकापचा बालेकिल्ला आहे. येथील अनेक विकासकामे शेतकरी कामगार पक्षाने पूर्ण केली आहेत, याचा आनंद आहे, असे मत पंडित पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बिनधास्त धनावडे, शुभम सरफळे, अमोल शिंगरे, दीपक गिजे, विकास भायतांडेल, राज जोशी, गणेश गायकर, रमेश सातामकर, चंद्रकांत कांबळे, मनोहर वारगे, संकेत जोशी यांच्यासह महादेवखार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.