अवेळी पावसामुळे वीट व्यवसाय संकटात

। पाताळगंगा । वार्ताहर ।
वातावरण बदलाचा फटाका मोठ्या प्रमाणावर बसला असून यामध्ये विट व्यवसाय पासून ते पालेभाज्या लागवड करीत असलेल्या शेतकर्‍यांना सुद्धा फटका बसला. सायंकाळी 7 वाजता अवेळी पावसाने सुरुवात केल्यामुळे अनेकांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने सुरूवात केल्याने सर्वत्र गारावा निर्माण झाला असला तरी वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचवण्याकरीता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले.वीट व्यवसायिकांचे नुकसान झाल्याने वीट भट्टी व्यवसाय संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे. अवकाळी पावासाने सर्वत्र ठिकाणी दाणादाण उडवून दिली त्याच बरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गावे अंधारात गेली.

Exit mobile version