असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पक्षप्रवेशाच्या अफवांना धैर्यशील पाटलांनी दिला पूर्णविराम
पेण | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून, आपल्या गावात विकासाची गंगा आणायची असेल, तर शेकापशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाल्याने वाशी आणि जिते विभागातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शेकापमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना मा. आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण तालुक्यामध्ये भाजपकडून उठवण्यात आलेल्या अफवांना पूर्णविराम देत सांगितले की, शेतकरी कामगार पक्षाचा एकही कार्यकर्ता कोठेही हलणार नाही. त्यामुळे आम्ही कोणत्या पक्षात जातोय, याबाबत चुकीच्या अफवा पसरवून सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. तसेच पुढे त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावर भाष्य करत शेतकरी कामगार पक्षाच्या नसलेल्या कार्यकर्त्यांना शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असा प्रवेश करून घेतला. जो प्रवेश केला आहे, तो चुकीचा आहे, असे ही सांगितले.
तसेच आमची राष्ट्रवादी बरोबर मैत्री आहे, परंतु ही मैत्री टिकवायची की तोडायची ही त्या पक्षानी ठरवाव. आम्ही मैत्री तोडणार्यातले नाहीत तर आम्ही मैत्री जपणार्यातले आहोत. तसेच जिल्हा परिषदेच्या पाचच्या पाच जागा निवडून आणण्याचा आत्मविश्वास यावेळी धैर्यशील पाटील यांनी बोलून दाखवला. तीस कोटी खारेपाटाच्या पाण्यासाठी मंजूर करून आणूनही एक फुटही पाईपलाईन टाकता आली नाही. कितीही कोंबडं ढाकायचा प्रयत्न केला तरी दिवस हा उजाडतोच. त्याचप्रमाणे आज याच मंडळीला सांगावे लागते की धैर्यशील पाटलांनीच तीस कोटी रूपये पाण्यासाठी आणले. त्यामुळे खारेपाटाला पाणी धैर्यशिल पाटीलच देणार हे निश्चित. आज काहीही नसताना देखील अनेक तरूण सहकार्यानी शे.का.पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याचा अर्थ एवढे नक्की की आजही शे.का.पक्षाला मानणारा वर्ग आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी केले. तर दिलीप पाटील, डी.एम.म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, हरि ओम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.आमदार धैर्यशील पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गणेश म्हात्रे, सुजित म्हात्रे व संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बाळकृष्ण रघूनाथ म्हात्रे, मा.सदस्य ग्रामपंचायत वढाव, अरूण गजानन म्हात्रे, नारायण म्हात्रे, मोहन माळी, सुधीर वसंत म्हात्रे, उमेश बाळाराम म्हात्रे, प्रदिप भोईर, राजन म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रोहित रमेश म्हात्रे, प्रदुन्न म्हात्रे, रोशन अनिल म्हात्रे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी राजेंद्र नथुराम थवई (बापू) मा. उपसरपंच तथा विद्यमान सदस्य यांना गेल्या आठवडयात चुकीच्या मार्गे राष्ट्रवादीत प्रवेश केला असे घोषित केले होते. परंतु ते आढावा बैठकीला हजर राहून मी शे.का.पक्षातच आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच जिते विभागातील लक्ष्मी नारायण आळीतील 14 तरूण सहकार्यांनी डि.बी.पाटलांच्या नेतृत्वाखाली शे.का.पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये सुरज म्हात्रे, अरूण म्हात्रे, जयेश म्हात्रे, अतिश म्हात्रे, सचिन म्हात्रे, राज म्हात्रे, विजय म्हात्रे, रवी म्हात्रे, वैभव पाटील, साहिश म्हात्रे, सनि म्हात्रे, किष्णा म्हात्रे, निरज म्हात्रे, ओमकार म्हात्रे यांचा समावेश आहे.
या प्रवेशच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य डि.बी.पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरि ओम), मा.सभापती सरिता म्हात्रे, जयप्रकाश ठाकूर, के.डी.म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, भाऊ ऐरणकर उपस्थित होते.
शेपटीवर पाय दिल्यास शेकाप डसल्याशिवाय सोडणार नाही ः संदेश ठाकूर
वाशी विभागाचे चिटणीस तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदेश ठाकूर यांनी विरोधकांना इशारा वजा दम दिला आहे की, शेतकरी कामगार पक्ष कुणाच्या वाटयाला जात नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या वाटयाला जो कोणी येतो त्याला आम्ही सोडत नाही. चार दिवसा पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र थवई यांचा चुकीच्या पध्दतीने पक्ष प्रवेश दाखवून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्ये देखील पक्ष सोडून दुसरीकडे जात आहेत असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा विरोधकांचा फसवा चेहरा संदेश ठाकूर यांनी सर्व मिडीया समोर आणत राजेंद्र थवई हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि ते पक्षातच राहतील, मात्र आमच्यातून चुकीच्या पध्दतीने एक नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही डझनाने आपले कार्यकर्त्ये शे.का.पक्षात घेतो; येवढ लक्षात ठेवाव आणि आजचा हा पक्ष प्रवेश म्हणजे विरोधकांना इशारा आहे. शे.का.प हा असा अंगारा आहे तो धुमसत नाही, तर डायरेक्ट पेट घेतो.