नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या नोव्हेंबरपासून आंदोलन करीत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने 25 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून जास्तीत जास्त शेतकर्यांना आंदोलनात सामील करुन घेतले जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे आशिष मित्तल यांनी सिंघू बॉर्डरवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षीच्या 25 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. कोरोनाचे संकट असूनही त्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आगामी 25 सप्टेंबरला पुन्हा भारत बंद पुकारण्यात आला आहे, असे मित्तल यांनी स्पष्ट केले.
कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी दोन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, 22 राज्यांमधील 300 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.