पाच एअरबेस आणि दोन रडार बेस नष्ट
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील 24 तासांत पाकिस्ताने 26 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तान आता हादरला आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सात ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून पाकिस्तान आता घाबरला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 5 एअरबेस आणि 2 रडार बेस पूर्णपणे नष्ट केले आहे. त्यामुध्ये नूर खान, रहमियार खान, रफीकुई, मुरीद, सियालकोट एअर बेसचा समावेश आहे. तसेच, 2 रडार बेस सिस्टमही उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानमधील स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ भारताकडून पाकिस्तानात झालेल्या नुकसानीच्या पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जमिनीत मोठे खड्डे दिसत आहेत.