। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील गाठेमाळ ठाकूरवाडी येथील 50 वर्षीय व्यक्ती महिन्याभरापासून बेपत्ता आहे. या व्यक्तीला कोणी पाहिले असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पाली पोलीसांनी केले आहे. वामन तानू वारे (वय 50 वर्ष) हे 8 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता कोणालाही काही न सांगता आपल्या घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप घरी परतलेले नाहीत. या संदर्भात वंदना वारे यांनी पाली पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. आजतागायत वारे मिळून आलेले नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.एम.परदेशी करीत आहेत.