जय भवानी पंतसंस्थेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मिलिंद चव्हाण यांची निवड

। अलिबाग ।  विशेष प्रतिनिधी ।
जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था अलिबागच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मिलिंद चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. आपल्या या निवडीबद्दल बोलताना अ‍ॅड. मिलिंद चव्हाण यांनी सर्व संचालकांच्या सहाय्याने आपण यापूर्वी जय भवानी पतसंस्थेचा नावलौकीक वाढविला असून, या पतसंस्थेच्या सहाय्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आणि पुढेही राबविणार असल्याचे सांगितले.
    

जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबागच्या नवीन कार्यकारिणीची निवड अध्यासी अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात  करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मिलिंद चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. उपाध्यपदी अभय म्हामुणकर, सचिव मंगेश म्हात्रे, खजिनदार गीता धर्माधिकारी यांचीही संचालकांमधून बिनविरोध निवड झाली. तर संचालक म्हणून भाऊराव म्हामुणकर, प्रभाकर गावडे, सुचित्रा चव्हाण, अनिल गोळे, रोहन चिमणे, सिद्धांत चव्हाण आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे लेखापरीक्षक संदीप गोठीवरेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version