। मुंबई । प्रतिनिधी ।
सचिंद्र आयरे फाउंडेशन व लालबागचा राजाच्या आशिर्वादाने शालेय विद्यार्थ्यांसाठी (दि.1) व (दि.2) जून रोजी कबड्डी खेळाचे दोन दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता अर्जुन पुरस्कार माया मेहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी तारक राऊळ, रवींद्र सुर्वे, भार्गव कदम, सचिंद्र आयरे, मिलिंद कोलते, संदीप काणेकर, अशोक लोटणकर, सुरेश गोरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना रविंद्र सुर्वे म्हणाले की, शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही मनसोक्त खेळा. खेळात प्रगती करताना ध्येय निश्चित करा, पण शॉर्टकट मारू नका. या खेळाडूंना मिलिंद कोलते, मोरे यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पांडुरंग भोगले यांनी केले.
विद्यार्थ्यांकरिता कबड्डी प्रशिक्षण शिबीर
![](https://krushival.in/grygrars/2024/06/mumbai-e1717407789275-1024x603.jpg)