ऐतिहासिक वारकरी परिषदेतून घडले समाज प्रबोधन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
संत गाडगेबाबा यांच्या 65 व्या पुण्यतिथीनिमित्त सुधागड तालुक्यात वारकरी परिषदेचे आयोजन सम्यक क्रांती विचार मंचाकडून करण्यात आले होते. संत गाडगे महाराजांचा वैचारिक वारसा पुढे प्रभावीपणे चालविण्यासाठी सुधागडातील कीर्तनकार एकवटले असून ऐतिहासिक वारकरी परिषदेतून समाज प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. या परिषदेसाठी सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर, गटविकास अधिकारी विजय यादव, महेश पोंगडे, किरण कुंभार, सुरेश पातेरे, राम महाडिक, चंद्रकांत घायले, कृष्णा आंग्रे, अमृत मोरे, मारुती दंत, महेश देशमुख आदींसह कीर्तनकार उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. प्रबोधनात्मक व वैचारीक दृष्टिकोन ठेऊन वारकरी परिषदेचे आयोजन केले होते. त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्यावतीने स्वागत करून एका नव्या पायंड्याला सुरुवात केल्याबद्दल सम्यक क्रांती विचार मंचचे अभिनंदन करण्यात आले. लोकाभिमुख, सामाजिक कार्य करणे हे आमचे कर्तव्य पार पाडीत असल्याचे मंगेश वाघमारे म्हणाले. या कार्यक्रमात संतांची प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्यासाठी योगदान देणार्या कार्यकर्ते, मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.