• Login
Thursday, January 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जगन्मित्र कवी

Varsha Mehata by Varsha Mehata
July 26, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
जगन्मित्र कवी
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कवी अंतर्मुख असतो, त्याचे जगणे या जगातील असूनही त्याचे स्वत:चे एक वेगळे या जगापासून फारकत घेतलेले एक जग असते असे साधारणत: समजले जाते. कवी सतीश काळसेकर त्यातील अपवादात मोडतात. त्यांचे जगणे या जगाला सोबत घेऊन जसे होते तसे ते आपल्या आतील जगालाही तेवढेच सांभाळण्याचेही होते. कारण या दोन्हींमध्ये त्यांच्या लेखी काहीही फरक नव्हता, या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी एकच होत्या. सतीश काळसेकर यांचा लोकसंग्रह इतका विलक्षण होता की, त्यांना जगन्मित्र म्हटले जाई. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍याला आपला करत त्यांचे कविता वाचत चाले, कविता ऐकणे चाले. म्हणून त्यांची स्वत:ची जितकी पुस्तके आली नसतील त्याच्या कैकपटीने अधिक पुस्तके त्यांनी इतरांची जन्माला घालण्यास मदत केली. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक नवोदित कवींना प्रकाशात आणले, अनेक लेखकांची पुस्तके वाचकांपर्यंत पोचवली. वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी जन्मलेल्या काळसेकर यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याच्या निमित्ताने मुंबईत येणे केले. त्यानंतर काही मासिकात आणि टाइम्समध्ये नोकरी केली. मात्र विद्यार्थी दशेपासूनच कविता करणार्‍या काळसेकरांना मुंबईत व्यापक परीघ लाभला आणि ते साहित्य निर्मिती करत साहित्याच्या तेव्हाच्या अभूतपूर्व चळवळीतही सामील झाले. ते 1960 च्या दशकात मराठीत उदयास आलेल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीतील महत्वाचे व्यक्तित्त्व बनले. साहित्यापासून ते चौकटयुक्त जगण्यापर्यंतचे प्रस्थापितांचे मानदंड नाकारणार्‍या या चळवळीत ते नारायण सुर्वे, अरुण कोल्हटकर, शहाणे, पाध्ये आणि भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत अनेकांच्या सोबतीने तीव्रतेने सहभागी झाले. त्यांची प्रतिक्रियावादी आणि बंडखोरीची भूमिका असली तरी त्यांची जगण्यावरची आणि मुख्य म्हणजे माणसांप्रतीची आसक्ती आणि श्रद्धा इतकी निस्सीम होती की तेव्हाही आणि शेवटपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या कटुतेला शिरकाव करता आला नाही. याचे कारण त्यांच्या कायम माणसांशी जोडले राहण्याच्या त्यांच्या स्वभावात असावे. किंवा आयुष्यभर त्यांना तरुणांइतक्या उत्साहाने कार्यरत ठेवणार्‍या प्रेरणेत असावे. वयाला साजेसे प्रेम केले उन्मादक उसळत्या लाटांतून वयाला साजेसा वागलो उन्मत्तासारखा दिवस-रात्रीतून
या त्यांच्या ओळी या संदर्भात बोलक्या आहेत. आपल्या कवितेबद्दलच्या लेखात त्यांनी ही भूमिका खूप स्पष्टपणे मांडली. ‘माझ्या एकूणच जगण्याची व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक आयुष्य अशी विभागणी करणे मला योग्य वाटत नाही; हे दोन्हीही परस्परांत मिसळलेले आहेत. या संयोगातूनच माझी कविता लिहिली गेली आहे. हा सगळा काळ वर्तमानकाळच आहे. त्यामुळे ही कविता या काळाचीच निर्मिती आहे.’ 1971 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला आणि कवी सतीश काळसेकर याला अवघे मराठी साहित्य विश्‍व ओळखायला लागले. मूळ पिंड कवीचा असला तरी त्यासोबत अनुवादासह अन्य गद्य वाङ्मयीन प्रकारही त्यांनी हाताळले. त्यांना त्यासाठी साहित्य अकादमी, सोव्हिएत लँड पुरस्कार आदी मानसन्मान लाभले. परंतु या पुरस्कारांची झुल त्यांच्यावर चढून ते प्रस्थापित झाले नाहीत. ते सामाजिक जीवनात भेटेल त्याचे कल्याण करणारे कार्यकर्ते होते आणि साहित्यासाठी तितकीच तळमळ आणि अस्वस्थता बाळगून असलेले तरुण होते. त्यांनी आयुष्यात माणसे कमावली आणि पुस्तकांची संपत्ती जपली. पेण येथील लेखक कलावंतांसाठीच्या आवासात पुस्तके आणि साहित्यनिर्मितीसाठी त्यांनी जागा निर्माण केली. पुस्तकांविषयी ही त्यांची पोस्टर कविता अनेकांच्या भिंतीवर अजून असेल. ‘मी कविता का लिहितो कारण मला कविता लिहिल्याशिवाय राहवत नाही, अशी होणारी मनस्थिती हे आहे. पण पुढचा प्रश्‍न मी स्वत:लाच विचारत असतो तो असा की, कविता लिहिल्याशिवाय राहवत नाही ते का? हा पुढचा प्रश्‍न अधिक छळणारा आहे. काहीतरी सांगण्यासाठी मी अस्वस्थ असतो’ या अस्वस्थतेला धरून अर्थपूर्ण जगू पाहणारा हा कवी पुस्तकांच्या संपत्तीबाबत तितकाच हळवा आणि वाहिलेला आहे, हे ती पोस्टर कविता वाचून कळते. त्यातील शेवटची ओळ, तरीही पुस्तके भाकरीसाठी विकता येत नाहीत, जितकी पुस्तकांबद्दल आहे तितकीच ती त्यांच्याबद्दलही. कविता, साहित्याच्या मार्गावरील हा तरुण, लाघवी आणि बंडखोर प्रवासी आपल्या पाउलखुणा मागे ठेवून आपला अचानकपणे निरोप घेऊन निघाला आहे. बरेच देऊन, काही आपल्यावर सोडून आयुष्यभर फेडत राहिलो अधल्यामधल्या उसनवार्‍या चिल्लर आणि मुळांतून जे द्यायलाच हवे होते ते तसेच राहून गेले पाठीवर त्यांना विनम्र आदरांजली.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यात 335 नवे कोरोना रुग्ण

Next Post

देशद्रोहाच्या कायद्याचं दुधारी अस्त्र

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
देशद्रोहाच्या कायद्याचं दुधारी अस्त्र

देशद्रोहाच्या कायद्याचं दुधारी अस्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?