| नाशिक | वृत्तसंस्था |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला. नाशिकमधील शांतता रॅलीदरम्यान चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मराठा आरक्षण शांतता रॅलीला मंगळवारी (दि.14) तपोवनातून मार्गस्थ झाला होता. या मोर्चामध्ये शहरासह जिल्हाभरातून समाज बांधव सहभागी झालेले होते. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरलेले आहेत. याप्रकरणी पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जरांगेंच्या रॅलीदरम्यान लाखोंचा ऐवज लंपास
![](https://krushival.in/grygrars/2024/08/db777b255a0530e81a538398daabb9df1723691907960923_original.avif)