| महाड | प्रतिनिधी |
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श माध्यमिक विद्यालय आंबवली या महाड तालुक्यातील अतिशय दुर्गम व डोंराळ भागातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला अभियान मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने संपन्न झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीता घोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी चेअरमन रमेश पवार यांनी स्वीकारले.
ग्रुप ग्रामपंचायत आंबवलीच्या सरपंच प्रतिमा गायकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाढत्या प्रदूषाणाची समस्या लक्षात नदी स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने राबवलेल्या या अभियानासाठी कृषी विभागाचे तानाजी जगदाळे (परीक्षक), सुरेश बोडक तसेच महसूल विभागाचे गणेश मत्सासागर, शरद कांबळे, महादेव पाटील, प्रणय बुल्लू, शांती सिंग हिरवळ प्रतिष्ठानचे गणेश कुर्डूनकर, जय अंबुर्ले, कुणाल गुरव तसेच रा.जि प. प्राथमिक शाळा आंबवली बुद्रुकच्या मुख्याध्यापिका बहुलेकर, निकम मॅडम, हुंबे, रा.जि.प.शाळा बुद्रुकचे मुख्याध्यापक प्रदीप शिंदे उपस्थित होते.
गणेश कुर्डूनकर तथा तानाजी जगदाळे या मान्यवरांनी नदीचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनात नमूद केले आणि नदीची स्वच्छता राखूया अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेऊन या असे विचार व्यक्त केले. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पाणीसाठा आणि त्याचे महत्त्व यावर आधारित लघु चित्रपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे आभार आंबवली सरपंच प्रतिमा गायकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे सहा. शिक्षक प्रज्ञा पाटील, जनार्दन पाटील, प्रल्हाद ठाकूर, विकास खिडबिडे शिक्षकेतर कर्मचारी अनिल काते,संतोष जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले.