• Login
Saturday, July 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लढवय्या नेता हरपल्याने मोठी हानी- शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन

Krushival by Krushival
September 19, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
लढवय्या नेता हरपल्याने मोठी हानी- शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन
0
SHARES
193
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिताराम येच्युरी यांना शेकापकडून श्रद्धांजली

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सिताराम येच्युरी एका उच्च शिक्षित अधिकार्‍यांचे सुपूत्र होते. ते सुध्दा चांगले अधिकारी बनले असते. परंतु, विद्यार्थी दशेपासूनच गोरगरीब, पिडीत, अन्यायग्रस्तांसाठी काम करण्याचा त्यांचा ध्यास होता. अन्यायाविरोधात उभे राहून शेतकरी, कामगार, कष्टकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील सेझ विरोधातील लढ्यामध्ये लाखो शेतकर्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे अलिबागसोबत एक वेगळे नाते होते, त्यांच्यासारखा लढवय्या नेता हरपल्याने डाव्या विचारांच्या चळवळीची फार मोठी हानी झाली आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेकापच्यावतीने अलिबागमधील शेकाप भवन येथील सभागृहात कॉ. सिताराम येच्युरी यांची श्रध्दांजली सभा गुरुवारी (दि.19) आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. दरम्यान, कॉ. सिताराम येच्यूरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही. जाधव, शेकाप महिला राज्य आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, राजेंद्र कोरडे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, विजय गिदी, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, जनार्दन पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, अशोक प्रधान, अवधुत पाटील, अनिल पाटील, पुरोगामी अलिबाग तालुका युवक संघाचे अध्यक्ष तथा मुरूड तालुका संपर्क प्रतिनिधी विक्रांत वार्डे, सुरेश खोत, आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिताराम येच्युरी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या लढ्यात, आंदोलनात अनेकवेळा मार्गदर्शन केले आहे. कोकण भवन येथे एक लाख शेतकर्‍यांच्या उपस्थितीत सेझविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चात सिताराम येच्युरी यांनी सर्वांना संबोधित केले होते. या लढ्याची दखल त्या वेळच्या सरकारला घ्यावी लागली होती. देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग असलेला येच्युरी यांच्या रुपाने देशाला चांगला नेता मिळाला होता. वैचारिक बांधिलकी जपणारे ते एक नेते होते. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मला अनेकवेळा बैठका, लढ्याच्या माध्यमातून मिळाली, असे पाटील यांनी सांगितले. गोरगरीबांचे कायदे अबाधित राहावेत, लोकशाही टिकावी यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले. पंचायतीपासून संसदेपर्यंत अस्थिरता निर्माण होण्याचा धोका त्यांच्या लक्षात आला होता. हे थांबविण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून अनेक पक्षाला एकत्र आणण्याचे काम सिताराम येच्युरी यांनी केले. खर्‍या अर्थाने इंडिया आघाडीची स्थापना त्यांनी केली, असे ते म्हणाले. डाव्या आघाडीचे स्फुर्तीस्थान अलिबाग होते. ते पुढे नेण्याचे काम नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांनी केले. त्यांचे काम आपण सर्वांनी अधिक जोमाने करण्याची गरज आहे. देशात सध्या वेगळ्या पध्दतीने राजकारण सुरु आहे. येच्युरी यांच्या निधनामुळे देशातील कष्टकरी, कामगार, डाव्या चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एक चांगला मित्र, गोरगरीबांसाठी लढणारा नेता गेल्याने मोठी हानी झाली असून त्यांची आठवण कायमच स्मरणात राहिल, असे पााटील यांनी स्पष्ट केले.

येच्युरी डाव्या आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक होते. शेकापची जडणघडण डाव्या विचारावर अधारीत आहे. तेलगू ब्राह्मण वर्गात जन्माला आलेली व्यक्ती अधिकारी बनले असते. परंतु त्यांच्यामध्ये देशसेवेची भावना रुजली. कष्टकरी, कामगार, महिला, पिडीतांसाठी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे येच्युरी यांनी त्यांच्या हितासाठी चळवळ उभी केली, असे शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी कष्टकरी, गोरगरीबांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. डाव्या पक्षाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील 2007 मधील सेझ विरोधातील मोर्चाचे नेतृत्व येच्युरी यांनी केले होते. त्यामुळे सेझ विरोधातील लढ्यात त्यांचेही मोठे योगदान राहिले आहे, हे विसरता येणार नाही. एक लढवय्या व डाव्या चळवळीचा योध्दा हरपला असे अ‍ॅड.म्हात्रे यांनी सांगितले.

सिताराम येच्युरी एक अभ्यासू व्यक्तीमत्व होते. एकनिष्ठा पाळणारे ते नेते होते. सध्या देशातील राजकारण पातळी सोडून चालू असताना, आपल्या पक्षाची विचारधारा शेवटच्या श्‍वासापर्यंत जनतेपर्यंत पोहचवून ठेवण्याचे आदर्शवत काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. ते कामगार चळवळशी निगडीत होते. आपल्या लेखनातून त्यांनी डावे विचार व्यक्त केले आहे, असे शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक यांनी सांगितले.

सिताराम येच्युरी यांची राजकीय वाटचाल विद्यार्थी दशेपासून झाली. त्यावेळच्या बोर्डाच्या परिक्षेत ते प्रथम आले. जगातले कोणतेही विषय सोप्या पध्दतीने सुलभ करून सांगण्याची त्यांची हातोटी होती. सध्याच्या राजकारणामुळे इंडिया आघाडी ही काळाची गरज आहे, हे ओळखून त्यांनी सर्व पक्षांना एकत्र करून एक मुठ बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. येच्युरी यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे, असे शेकापचे राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.

कुशाग्र बुध्दीमतेचा अभ्यासू नेता होता. न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हा विचार त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच घेतला होता. विद्यार्थी, कष्टकरी, कामगार आदींच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता. आदिवासींना मालकी हक्काच्या जमीनी देण्यासाठी येच्युरी यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे, असे प्रा. एस. व्ही. जाधव यांनी सांगितले.

Related

Tags: alibag newsindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSitaram Yechuryskp newssocial media newssocial news
Previous Post

शेतकर्‍यांना नुकसानीची प्रतिक्षा

Next Post

दुधाची तहान ताकावर, कोटाची घडी मोडणार

Krushival

Krushival

Related Posts

दोन वर्षांनंतरही इर्शालवाडी दरडग्रस्त वाऱ्यावर
sliderhome

दोन वर्षांनंतरही इर्शालवाडी दरडग्रस्त वाऱ्यावर

July 18, 2025
आता आमदार, स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश
sliderhome

आता आमदार, स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश

July 18, 2025
प्लास्टरच्या मूर्तींना कागदी लगद्याचा पर्याय
उरण

प्लास्टरच्या मूर्तींना कागदी लगद्याचा पर्याय

July 18, 2025
आंबेनळी घाटरस्ता बंदीसाठीचे प्रयत्न वाढणार?
sliderhome

आंबेनळी घाटरस्ता बंदीसाठीचे प्रयत्न वाढणार?

July 18, 2025
शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?
sliderhome

शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?

July 18, 2025
पाण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना घेराव
पनवेल

पाण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना घेराव

July 18, 2025
Next Post
दुधाची तहान ताकावर, कोटाची घडी मोडणार

दुधाची तहान ताकावर, कोटाची घडी मोडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+29°
+27°
Alibag
Friday, 18
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +26°
Monday
+28° +26°
Tuesday
+27° +26°
Wednesday
+27° +26°
Thursday
+28° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.