महाड: दरडग्रस्तांचा गृहप्रवेश लांबणीवर

म्हाडाच्या ठेकेदाराकडून विलंब
| महाड | चंद्रकांत कोकण |
आधी निसर्गाने हिरावून नेले आणि मायबाप सरकारच्या अवकृपेने हक्काचा निवाराही वेळेत मिळण्यास विलंब होऊ लागला आहे. यामुळे मागे लागलेले संकटांचे शुक्लकाष्ट संपता संपेना असेच म्हणण्याची वेळ दरडग्रस्तांवर आली आहे. महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळल्याने मातीच्या ढिगार्याखाली 66 गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू आहे.मात्र सर्व घरांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराकडून वारंवार मुदत वाढवली जात असल्याने ग्रामस्थांना गृहप्रवेश करण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता तळीये ग्रामपंचायतचे माजी सरपंच संपत दांडेकर यांनी केली.

तळीये येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम जरी सुरू करण्यात आले असले तरी काम अतिशय संथ गतीने केले जात असल्याचे म्हणणे ग्रामस्थांची आहे. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांची घरे उभारण्याचे काम सुरू केल्यानंतर आत्तापर्यंत 17 घरांची कामे झाली आहेत, तर 100 घरांच्या जोत्याची कामे झाली आहेत. त्या ठिकाणी एकूण 271 घरे उभारण्यात आहेत, ही घरे 2023 पर्यंत पूर्ण होऊन बाधित कुटुंबे आपल्या नवीन घरात राहायला जातील असा विश्‍वास संबंधित ठेकेदाराकडून व्यक्त केला जात असला तरी एकूण कामाची गती पाहता पुढील दोन वर्षात काम पूर्ण होईल किंवा नाही याबद्दल खात्री देणे शक्य नाही.

सध्या कंटेनर मध्ये राहत असलेली 25 कुटुंबे मार्च अखेर उर्वरित 41 कुटुंबीयांना प्राधान्याने लवकरात लवकर घरे बांधून देण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. सुरुवातीला ज्या ठिकाणी गाव अस्तित्वात होते त्या ठिकाणी पुनर्वसन करावे असा आग्रह धरण्यात आला होता . परंतु त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे गावापासून थोड्या अंतरावर जवळच पुनर्वसनाकरिता जागा संपादित करण्यात आली. प्रत्यक्ष 66 कुटुंबे नष्ट झाली आणि उर्वरित कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले अशी एकूण 271 घरे राज्य सरकारच्या प्रयत्नातुन घरे उभी करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला 623 चौरस फूट क्षेत्राची घरे देण्यात येतील. ही घरे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणारी भूकंपावरोधक शिवाय तापमानाचे संतुलन राखणारे असतील याकरिता घरांच्या छपराकरिता पफ पॅनलचा करण्यात येत आहे भाडाने घरे उभारण्याचे काम ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. आत्तापर्यंत 120 घरांचा पाया व भिंती उभारण्याचे काम सुरू करण्यात आला आहे या महिना अखेर 200 घरांचे प्राथमिक काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरडग्रस्तांंना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य घेतली आहे. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते,शाळा अंगणवाडी समाज मंदिर आरोग्य सुविधा इत्यादींचा समावेश आहे. काम काम सुरू करताना कंटेनरमध्ये राहत असलेल्या कुटुंबीयांना जानेवारी अखेर नवीन घरे मिळतील असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात फक्त सतरा घरांची प्राथमिक उभारणी करण्यात आली आहे यामध्ये आतील कामे वीज पुरवठा पाणीपुरवठा इत्यादी सोयी सुविधांची अपूर्ण आहेत. दिवाळीपूर्वी घरांचा ताबा मिळणे अशक्य आहे. – संपत दांडेकर, तळीय माजी सरपंच

Exit mobile version