। अलिबाग । वार्ताहर ।
ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पंचायत समिती, रायगड व जिल्हा परिषद यांच्यामार्फत महापंचायत राज अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचा साळवे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या, साळवे आदिवासी वाडी, पानोसे, पानोसे आदिवासी वाडी, पानोसे कोंड इत्यादी ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, सरपंच मंगल कोळी, उपसरपंच तटगुरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री.काप व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवलीचे कर्मचारी वृंद, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रभे आरोग्य, शिक्षण उपजीविका यावर मार्गदर्शन केले. तसेच साळवे ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी विस्तार अधिकारी श्री.गायकवाड यांनी ग्रामपंचायत मार्फत दिले जाणारे लाभ व महापंचायत राज अभियान आझादी का अमृतमहोत्सव हे अभियान पूर्ण देशभर सुरू असून या लाभांपासून कोणीही वंचित राहू नये, असे आवाहन केले. कृषी अधिकारी श्री.काप यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते के.वाय.सी याबद्दल उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली व पानोसे गावातून पी.एम.किसान (झच-घखड-छ) योजनेचा जास्त सहभाग असल्याने लाभार्थ्यांनी वेळेत के.वाय.सी प्रमाणीकरण पूर्ण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. सूत्रसंचालन ग्रामसेविका सरिता दपके यांनी केले.