शेतकर्यांचे चिंतेचे वातावरण
| अलिबाग | प्रतिनिधी |
कोकणचे अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून असतं. मात्र, हेच आंबापीक अधिकच्या उष्णतेमुळे आलं आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे. हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, मोहोर आणि छोट्या कैर्या गळून पडत आहेत. यामुळे कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस तापमानाचा पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने आंबा बागेला योग्य फळधारणा झालीच नाही. तुरळक ठिकाणी काही अंशी आंबा पिक आले तर उर्वरित भागात केवळ काही भागात आंबा पिकाला फुलोरा येत असतानाच उष्णतेच्या फटक्यात आंबा पीक सापडले आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदार आले आहेत. सध्या जिल्ह्यात रात्री उशिरा गारवा, तर दिवसभर प्रचंड उष्णता असे चित्र आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांत तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील तापमान 35 अंशांपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा पिकाना बसण्यास सुरुवात झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. तापमान अंशांपर्यंत गेल्यामुळे काही ठिकाणी आंब्याची फळे उष्णतेने भाजल्यासारखी दिसत आहेत.
पारा चढणार
मागील काही दिवसांपासून उष्णतेचा कडाका वाढला आहे. परिणामी, तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचा पारा 30 अंशाच्या वर गेला असून, तो आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. आधीच अंगाची लाहीलाही होत असताना पुढील पाच दिवस उकाडा अधिक वाढणार असून, कमाल तापमानात तीन ते पाच अंशांतनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हवामानबदलाचा फटका सातत्याने आंबा पिकाला बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे मोहोर करपून जाण्याची भीती आहे. तसेच छोट्या कैर्याही भाजल्यासारख्या पिवळसर दिसत आहेत. उष्णतेच्या मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. – सुनील घरत, आंबा बागायतदार, चौलमळा