उरण तहसील कार्यालयावर न्यायासाठी मोर्चा

उरणच्या समस्या मार्गी लावण्याची शिवसेनेची मागणी

| उरण | वार्ताहर |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण तालुक्यात सातत्याने उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडी, खराब खड्डेमय रस्ते, ढासळलेली कायदा व्यवस्था, वाढते अपघात, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.8) उरण तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उरण तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यासमस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीतून उरण तालुक्यात सातत्याने उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडी, खराब खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत पार्किंग, वाढती अंमली पदार्थांची विक्री, विजेची समस्या, ढासळलेली कायदा व्यवस्था, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करावी तसेच शेती व मासेमारी करणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली होती.

परंतु संबंधित प्रशासनाने उपरोक्त जनहिताच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उरण तहसील कार्यालय याठिकाणी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी व जनहिताच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मनोहर भोईर यांनी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या निदर्शनास उरणकरांच्या समस्यांचा पाढा वाचला व उरणची आमसभा पाच वर्षे का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी व अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी करुन उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची तसेच महिलांसाठी स्वच्छनागृह निर्माण करण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. अन्यथा चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

सदर मार्चच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी समिर वाठारकर, उप गटविकास अधिकारी डॉ. संतोष डाबेराव, पोलीस अधिकारी सुर्यकांत कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ बी. एम. काळेल, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, महिला आघाडीच्या भावना म्हात्रे, ज्योती सुरेश म्हात्रे, मनिषा ठाकूर, रंजना तांडेल, तालुका संघटक बी.एन.डाकी, दिपक भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शिवसेना तालुका उपसंघटक रुपेश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, कोप्रोलीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, कोप्रोली माजी शाखाप्रमुख आकाश म्हात्रे, अशोक घरत, श्याम मोकाशी, नंदन म्हात्रे, महेश कोळी, संतोष कोळी, लक्ष्मण ठाकूर, राजेश भोईर, अमिताभ भगत, मंगेश थळी, नारायण तांडेल, नितेश पाटील, नयनेश भोईर, लवेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

उरणच्या जनतेच्या निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील तसेच तलाठ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. पाऊस कमी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. असे आश्वासन डॉ. उध्दव कदम यांनी दिले.

Exit mobile version