| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोव्हिड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखांमधील अधिकारी तसेच कर्मचार्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी याबाबत पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार कोव्हिड-19 चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता, संभाव्य धोक्याच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी स्वास्थ्य व परिवार कल्याण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी/कर्मचार्यांनी कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि.26 डिसेंबर पासून मास्कचा वापर करणे अनिर्वाय असल्याचे पत्रकात म्हटले आहे.