| रोहा | वार्ताहर |
रायगड जिल्हा कृषी प्रभोधनीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील विविध शेतकरी संघटना व शेतकरी यांची सभा रोहा येथे संपन्न झाली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये आंबा पीक विमा हप्त्यांची रक्कम यावर्षी 70 रु. वरून 294 रु. केल्यामुळे शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यात तीच रक्कम 130 रु. आहे, असेही सांगण्यात आले. जिल्ह्यत सूरू असलेल्या भात खरेदी केंद्रावरील भाताचा हमीभाव वाढवून मिळावा , हमी भावाचे पैसे व बोनस एक महिन्याच्या आत मिळावा, तसेच सध्या ज्या शेतकर्यांनी केंद्रावर आपले सातबारे रजिस्टर केले नाही, त्यांचे भातही खरेदी करावा. तसेच प्रत्येक शेतकर्याप्रती 19 क्विंटल भात घेण्याचा नियम असताना, फक्त 8 ते 10 क्विंटल भात केंदावर घेतल्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होत आहे. या महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व शेतकर्यांचे नुकसान झाल्यामुळे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकर्यांना भरपाई मिळावी आदी विषयांवर चर्चा झाली.
सदर सभेत रोहा शेतकरी प्रनिष्ठान रोहा, रायगड जिल्हा कृषी प्रबोधनी, बळीराजा शेतकरी सामाजिक संघटना, रायगड जिल्हा शेतकरी संघटना पेण व भूमीपुत्र शेतकरी एमआयडीसी संघर्ष संघटना रोहा, शेतकरी उत्कर्ष संघटना महाड, शेतकरी प्रतिष्ठान खालापूरचे पदाधीकारी उपस्थित होते .