| कोर्लई | वार्ताहर |
फणसाड वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्य परीमंडळ क्षेत्रात बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर रस्त्यालगत जाळरेषा अभियान राबविण्यात आले.
साधारणत: पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात दरवर्षी वनांना लागणारे वणवे ही चिंतेची बाब असून वनखात्याची डोकेदुखी ठरत असते. वनाना वणवे लागून होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वनविभाग दरवर्षी उपाययोजना करीत असते. यावर्षी देखील वनांचे वणव्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी मुरुडच्या फणसाड वन्यजीव अभयारण्यातर्फे अभयारण्य परीसरातील सीमारेषे लगत जाळरेषा आखण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचाच भाग अभ्यारण्य परीमंडळातील अलिबाग-मुरुड रस्त्यालगत बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर येथील अभयारण्य रस्त्यालगत जाळरेषा काढण्याचे काम वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शरद शिंदे, वनरक्षक रुपेश इंगोले, केरबा खांडेकर व वनमजूर यांनी केले.