| सौदी | वृत्तसंस्था |
सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जिझानजवळ एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने पीडित कुटुंबांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने सांगितले की, ते स्थानिक अधिकारी आणि पीडितांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत.
आज बुधवार (दि.29) सौदी अरेबियाच्या पश्चिम प्रदेशातील जिझानजवळ रस्त्यावर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 9 भारतीय नागरिकांनी त्यांचा जीव गमवावा लागला. शिवाय अनेकजण जखमी देखील झाले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या अपघाताबाबत भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विटरवर म्हटले आहे की, “सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जेद्दाहजवळ झालेल्या रस्ते अपघातात भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण सहकार्य करत आहे. अधिकारी आणि पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.