| महाड | वार्ताहर |
जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचा स्पर्धात्मक उपक्रम अनेक वर्षांपासून रंगगंधकला संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या स्पर्धेचे एकविसावे वर्ष असून महाराष्ट्रात 25 विविध केंद्रावर प्राथमिक फेरी होत आहे. यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील अभिवाचक स्पर्धक संघांची प्राथमिक फेरी आपली वाणीफच्या महाड केंद्रातर्फे रविवारी (ता.28)पार पडली.
महाड येथील संस्थेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये एका संघातून दोन ते पाच कलाकारांना 25 ते 30 मिनिटांचे साहित्य अभिवाचन करायचे होते. त्यात गूढकथा / रहस्यकथा किंवा चरित्रकथन अशा साहित्य कृतीचे विषयाला धरून नाट्यात्मक अनुभूती देणारे अभिवाचन प्राथमिक फेरीत निवडक सात संघांनी भाग घेतला होता. सहभागी संघातून उत्तम वाचिक अभिनयासाठी रश्मी जंगम (राजा वर्मा) प्रणिता शेट (चौथी खिडकी) आणि विभावरी जोशी ( बंध-अनुबंध) करीता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सांघिक बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांक-अंतिम फेरीचे निमंत्रण, प्रमाणपत्र, पाचशे रुपये चित्रकूट संघ, रत्नागिरी (कथा-वॉचमन) सचिन विर यांना भारी संघ, महाड (कथा-बंध-अनुबंध) गौरी मेहंदळे यांना तर तृतीय क्रमांक दोनशे रुपये, प्रमाणपत्र अभिव्यक्ती, महाड (राजा रवी वर्मा) रश्मी जंगम यांना देण्यात आला.
अंतिम फेरी चाळीसगावमध्ये राकेश मेहता यांच्याहस्ते स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली. बाह्यपरिक्षक म्हणून ङ्गरंगगंधफतर्फे महाड येथील प्रसिद्ध अभिनेत्री ॲड. मानसी मराठे आणि आपली वाणी महाडतर्फे अंतर्गत परीक्षक म्हणून लेखिका दीप्ती वारांगे यांनी जबाबदारी पार पाडली. अश्विनी मेहता यांनी दोन्ही मान्यवर परीक्षकांचे स्मृतीचिन्ह सन्मान केला. या अभिवाचन स्पर्धेची अंतिम फेरी 23, 24, 25 रोजी चाळीसगाव येथे होणार आहे.