बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे आंदोलन

राज्य सरकार केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी
। बीड । प्रतिनिधी ।
बीड येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली 8 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात शेकापच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनातील प्रमुख मागण्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हे. 50 हजार रुपये तात्काळ मदत करा. एफआरपीचे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एक रक्कमी 14 दिवसाच्या आत द्या. 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा. बीड जिल्ह्यातील पाझर तलाव नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करा. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ॲड. नारायण गोले पाटील ॲड. संग्राम तुपे, दत्ता प्रभाळे, अर्जुन सोनवणे, भीमराव कुटे, नवनाथ जाधव, अमोल सावंत प्रशांत चाटे, मुंजाबा पंचाळ, बलभीम भगत विलास मुंडे, बालू इतापे इतर शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. मागण्या पुर्ण न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Exit mobile version