कवी भास्कर पाटील यांचे निधन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद, उरण मधुबन कट्ट्याचे उपाध्यक्ष भास्कर पाटील यांचे नुकतेच वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते एक उत्कृष्ट कवी गायक होते. मधुबन कट्टा यशस्वी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आईच्या बांगड्या हा कवितासंग्रह विशेष उल्लेखनीय ठरला आहे. कान्हा तुझी बासुरी…. ही त्यांनी गायलेली गवळण रसिकांना मंत्रमुग्ध करीत असे. त्यांच्या निधनाची अचानक आलेली बातमी कविगणात हळहळ निर्माण करुन गेली. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी कवींसह मोठा संगीतप्रेमी वर्ग उपस्थित होता. यावेळी कॉम्रेड भूषण पाटील, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, कामगार नेते यशवंत ठाकूर, नाटककार मच्छिंद्र म्हात्रे, कवी प्रकाश ठाकूर आदींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version