शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत मुख्यंमत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला असून,येत्या सोमवारपासून शाळा सुरु होऊ शकतील,असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी सांगितले. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.


निर्णय आल्यानंतर शाळा सुरु करण्यासंबंधी प्रक्रियेला सुरुवात होईल. स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय व्हावा अशीच आमचीही इच्छा आहे. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण व्हावं यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर येऊन लसीसकरणाची विनंती केली आहे. तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही लस घेऊनच शाळेत यावं असंही सांगणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Exit mobile version