मुंबई | प्रतिनिधी |
राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आज ओबीसींच्या जनगणनेसाठीसाठी आक्रमक झालेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभवनावर धडक मारली. त्यांनी विधानभवनासमोर जोरदार आंदोलन केले. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.
अचानक मोठ्या संख्येने आंदोलक येथे जमले. यामुळे त्यांची धरपकड करण्यात आली. मात्र यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर संतापले होते. आता हे आंदोलन आम्ही गावपातळीपर्यंत घेऊन जाऊ असे देखील आंबेडकरांनी जाहीर केले आहे. तसेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायलाच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करायलाच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षण देखील आपोआप मिळेल, असे ते म्हणाले.
या मोर्चाविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची मागणी कोर्टामध्ये लावून धरली नाही. यामुळेच ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था पाहणे ही त्यांची जबाबदारी आहे यामुळे त्याकडे त्यांनी पाहावे. आम्ही शांततेमध्ये आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. कारण हा आमचा अधिकारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तरीही आमचे आंदोलन सुरू राहीलफ असे देखील मलिक म्हणाले आहेत.