। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मुरुड मार्गावरिल काशिद पुलाच्या दुर्घटना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याने त्यांच्या विरोधात मुरुड पोलिस ठाण्यात मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करीत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड पोलीस ठाणे हद्दीत 11 जूलै 2021 रोजी रात्री 8 च्या सुमारास मौजे काशीद गावच्या हद्दीत मोरीचे उत्तरेकडील तळाच्या भागास भगदाड पडलेले होते. त्यावरील भागास तडे गेले होते. मोरीच्या खालील सिमेंट कॉकरेटच्या फरशीचा भाग तुटुन त्याखाली भुयार तयार झाले होते. तसेच मोरीच्या पुष्ठभागावर पुर्व पश्चिम एक तडा पुर्ण रस्त्याला गेला होता. सदरचा पुलाची अवस्था गेल्या एक वर्षापासुन मुरूड व काशिद ग्रामस्थांनी तसेच मुरूड तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना गेले सहा महान्यापुर्वी माहीती दिली होती. तसेच काशिद ग्रामपंचायतीने त्याबाबत लेखी अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग मुरूड कडील संबंधित अधिका-यांना दिला होता. तरीही पुलाचे मजबुती करणाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे दिनांक 11/07/2021 रोजी झालेल्या पावसामुळे सदरची मोरी रस्त्यासह वाहुन गेली आहे त्या मोरीत विजय गोपाळ चव्हाण वय: 55 वर्ष, रा.एकदरा ,ता.मुरूड हे अलिबागकडुन मुरूडकडे त्यांचे मालकीच्या दुचाकीसह मोरी तुटलेल्या खोलगट भागात पडल्याने त्यांच्या नाकास व डोक्यास दुखापती झााल्या. पाण्यात वाहत जाउन बुडुन मरण पावले आहेत. तसेच सागर मनोहर भायदे व त्यांची पत्नी शोभा सागर भायदे (38 वर्ष) निल सागर भायदे (35) तिन्ही रा. मुरूड, उर्जिता प्रसाद संखे (38), पुष्पा संजु सकपाळ (38) वर्ष दोन्ही रा.कळवा ठाणे यांचे दुखापतीस नमुद पुलाचे हद्द असलेल्या मुरूड ते कशिद कार्यक्षेत्रांतील सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी हे त्यांच्या हयगयी व बेजबाबदारपणामुळे सदर पुल पडुन मयत इसमाचे मृत्युस जखमींच्या दुखापतीस तसेच इर्टिगा कार व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाले असल्याबाबत तक्रार करण्यात आली असून. त्यानुसार त्यांच्याविरोधात याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.