। पेण । संतोष पाटील ।
नागोठणे येथील रिलायन्स आयपीसीएल कंपनीच्या सांडपाण्याने पेण तालुक्यातील शेतकरी,मच्छिमारांचा घात केला असून,या सर्वांवर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.याविरोधात शेतकरी,मच्छिमार कमालीचे संतप्त झाले असून,नुकसानभरपाईसाठी आंदोलनाचा इशारा देण्यातआला आहे.
आयपीसीएलमध्ये साधारणता 1986 पासून उत्पादनाला सुरूवात केली. तेव्हा पासून कमी जास्त प्रमाणात येथील शेतकर्यांना व मच्छिमारांना या कंपनीच्या सांडपाण्याचा त्रास होत होता. ज्या वेळेला कंपनीचा उत्पादन सुरू झाला त्या वेळेला सांडपाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकून हा पाणी धरमतरच्या खाडीत सोडण्यात आली. पहिले काही वर्ष हा सांडपाणी थेट धरमतर खाडीत सोडल्यामुळे याचा त्रास मोठया प्रमाणात मच्छिमारांना होत होता. कारण मच्छिमारांवर उदनिर्वाह करणार्या परिसरातील मच्छिला केमिकलचा वास येऊ लागला. त्यामुळे या परिसरातील मच्छिमारांची मच्छि घेण्यास कुणीही धजावत नसे. नंतर नंतर तर या केमिकलच्या सांडपाण्यामुळे मच्छिच प्रजनन होण बंद झाल. त्यातच आज 35 वर्ष होऊन गेल्याने सांडपाण्यासाठी वापर आलेल्या पाईपला मोठया प्रमाणात छिद्र पडून हा सांडपाणी कित्येक शेतकर्यांच्या शेतामध्ये जात आहे. ज्या ज्या शेतांमध्ये हा सांडपाणी येतोय ती ती शेत नापिक होण्याच्या मार्गावर आहेत.तसेच या परिसरातील नागरिकांच आरोग्य देखील धोक्यात येत आहे.
कित्येक वेळेला कंपनी प्रशासनाला या बाबत लेखी निवेदन देउन सुध्दा कंपनी प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करत आहेत. पेण सभापती मनिषा संजय भोईर यांनी उपविभागीय कार्यालय पेण येथे झोतीरपाडा, मुंढाणी, गांधे अटिवली, चोळे या परिसरात प्रदुक्षित केमिकलचा सांडपाणी येउन शेतकरी,मच्छिमारांचे नुकसान होत असल्याच लेखी तक्रार देखील केली आहे. परंतु त्यावर ठोस कारवाई काय झालेली आहे या विषयी नागरिकांना काहीही माहिती नाही. तसेच शेतकरी संघर्ष समिती शिहू विभाग यांनी देखील वेळोवेळी प्रदूषीत सांडपाण्या विषयी आवाज उटवून शासनाचे या मुदयाकड लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला तसेच शेतकरी कंपनी प्रशासन आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीची देखील मागणी केली परंतु त्यकडे देखील दुर्लक्ष केले. शेवटी संघर्ष समितीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे.
रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी असणारे धनावडे हे येथील नागरिकांच्या भावनांशी खेळून मन मानेल तसे वागत असल्याने व ही व्यक्ती स्थानिक नागरिंकांना कंपनी प्रशासना पर्यत पोहचू देत नाहीत. तसेच नागरिक काय विचारायला गेल्यास त्यांना अरेरावीची उत्तर देऊन कुणाकडेही तक्रार करा असे सांगतात.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे, यांनी वेळोवेळी अर्ज विनवण्या करून देखील ना प्रशासन लक्ष देत ना कंपनी अखेर आम्ही शेतकरी संघर्ष समितीने अमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
कंपनी प्रशासनाला व शासनाच्या प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील प्रदुषीत सांडपाण्याचा प्रश्न सोडवला जात नसल्याने या प्रदुषणा बाबत प्रदुषण बोर्डाकडे आपण रितसर तक्रार करणार आहोत तसेच नजिकच्या काळात मच्छिमार व शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पर्यावरण मंत्र्यांची देखील भेट घेणार आहोत.
मनिषा भोईर, सभापती
सभापती यांनी दिलेल्या पत्राची दख्खल घेत कंपनी प्रशासनाला आपण कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. परंतु कंपनी प्रशासनाकडून काहीही उत्तर आलेल नाही.
-विठ्ठल नामदार, प्रांताधिकारी