। अलिबाग। वार्ताहर।
सध्या बदलत चाललेल्या हवामान आणि सतत होत असणाऱ्या प्रदूषणामुळे गेली अनेक वर्षे वातावरणात अनपेक्षित बदल घडताना दिसत आहे. याच बदलत्या हवामानाचा फटका पुन्हा एकदा अलिबाग तालुक्यातील नागांवसह काही ठिकाणांना बसला. अलिबागमधील काही ठिकाणी अवकाळी पावसाने रात्री अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.