राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

। मुंबई । प्रतिनिधी ।

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. बुधवारी या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आता अमरावती येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. अटी शर्तींसह या पती-पत्नींना जामीन मजूंर झाला असून 12 दिवसांनंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दाम्पत्यांनी पून्हा अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नये. माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, पोलिस ठाण्यात हजेरी लावावी अशा काही अटी न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत, असे केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version