। मुंबई । वृत्तसंस्था।
मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या उपनगरातील जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटविण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रारही करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे राणे यांच्या बंगल्याची तपासणी केली गेली. दरम्यान, या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना दिले आहेत.