मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (20 ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्या शिवाय मंडळाने या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे. 12 वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार या परीक्षेला यंदा 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1 हजार 809 विद्यार्थी परिक्षेला हजर राहिले त्यापैकी 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 25.87 टक्के इतकी आहे.
10 वीच्या निकालामध्ये 12 हजार 363 अर्ज करणार्या विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 10 हजार 477 जणांनी 10 वीची परिक्षा दिली होती. उत्तीर्ण होणार्यांची टक्केवारी 29.14 टक्के इतकी आहे.