। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथील भैरवनाथ महाराज यांची पालखी तेथील पंचक्रोशीत फिरून आणली जाते. त्या पालखीच्या मार्गात हालीवली ग्रामपंचायत मधील वाट ही अवघड रस्त्याची होती.तो रस्ता आणि त्या रस्त्याच्या कडेला पथदिवे ही कामे प्रमिला बोराडे यांनी मार्गी लावली असून त्याबद्दल ग्रामस्थ कौतुक करीत आहेत.
हालिवली ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा होतो. मानाची काठी आणि भैरवनाथाची पालखी ज्या रस्त्याने जात असते, तो रस्ता काही ठिकाणी डोंगराळ भाग आणि रात्रीचा अंधार यामुळे ग्रामस्थांची पालखीची वाट धोकादायक बनलेली होती. पालखी मार्गाचा रस्ता तयार झाल्यानंतर आणि वेताळेश्वर देवस्थानपर्यंत रस्त्याच्या कडेला पथदिवे लावण्यात आले त्यांचे लोकार्पण बोराडे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी सुरेश बोराडे, केतन बोराडे, दत्ता मणेर, मेघा बोराडे, दर्शना बोराडे, सुवर्णा बोराडे, सोपान बोराडे, रामदास राणे, राजेंद्र शिंदे, जयवंत बोराडे, संदिप बोराडे, राजेश जाधव, विलास बोराडे, वसंत बोराडे, मनिषा बोराडे, करूणा बोराडे, आदी उपस्थित होते.