रोहितचं नाव होणार अजरामर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इतिहास रचू शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळली जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान जर रोहित शर्मा 2 शतकं झळकावण्यात यशस्वी ठरला, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचा मोठा विक्रम करू शकेल. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण करण्यापासून दोन पाऊले लांब आहे. असे झाल्यास हा विक्रम करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. भारतासाठी आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतकं झळकावली आहेत.

Exit mobile version