1000 पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार
शेकाप युवानेते निलेश थोरे-पाटील यांचा निर्धार
माणगाव | प्रतिनिधी |
संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांचा संपाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे.शेकाप चे कार्यकर्ते ठीकठिकाणी एसटी कर्मचार्यांच्या भेटी गाठी घेऊन पाठींबा देत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर शेकाप जेष्ठ नेते बाळकृष्ण अंबुर्ले,युवा नेते निलेश थोरे पाटील, कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ व इतर कार्यकर्त्यांनी माणगाव आगार येथे जाऊन संपाला पाठींबा जाहीर केला व कर्मचार्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.तसेच मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना शेकापतर्फे 1000 पत्रे पाठविण्याचा निर्धार निलेश थोरे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी बोलताना युवानेते निलेश थोरे यांनी सांगितले की आताचे सरकार हे सगळ्याच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरले आहे, समाजातील प्रत्येक वर्गाची जनता आज अत्यंत निराश आहे.राजकीय पक्षांचे आंदोलने, मोर्चे निघतात तेव्हा एसटी ची तोडफोड केल्यास सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून भरपाई घेतली जाते मग जर वाहन सरकारी असेल तर चालक आणि वाहक हे सरकारी कर्मचारी कसे नाहीत?शेतकरी कामगार पक्ष हा कायमच कामगारांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे त्यामुळे आम्ही सगळेच शेकाप कार्यकर्ते ह्या आंदोलनात सहभागी होणार असुन, कर्मचार्यांची व्यथा व त्यांच्या समस्यांची जनजागृती करण्याकरिता माणगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करून तब्बल एक हजार नागरिकांच्या पाठींबा देणार्या स्वाक्षर्या केलेले पत्र थेट मुख्यमंत्री महोदयांना पाठवणार आहोत व कर्मचार्यांच्या ह्या आंदोलनात सर्व प्रवाशी व जनतेला सामील करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले, दरम्यान आगारातील सगळ्या कर्मचार्यांनी जनतेला आंदोलनात सामावून घेणार असल्याबाबत निलेश थोरे यांचे आभार मानले व व्यथा मांडायला व ऐकून घेणारी आपली हक्काची व्यक्ती निलेश थोरेंच्या रूपाने मिळाल्याने सर्व कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.