|पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडित पनवेल ते महाडला जाणार्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला मंगळावारी (ता.25) अपघात घडला. या अपघातात एका 31 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. दहाच दिवसापूर्वी (ता.15) जुन्या मुबंई पुणे महामार्गांवर खोपोली येथील घाटात झालेल्या बस अपघातात 13 जणांना मृत्यूने गाठले. दोन्ही अपघाता नंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असला तरी अपघात प्रसंगी बसचा असलेला अति वेग आणि अपघात घडलेल्या ठिकाणी असलेली नागमोडी वळणे अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरली आहेत.
मंगळवारी घडलेल्या अपघाता नंतर काही प्रत्यक्ष दर्शिनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसचा वेग जास्त असल्याने पनवेलवरून महाडच्या दिशेने जाणारी बस दुभाजकाला धडकून पुन्हा पनवेलच्या दिशेला वळाली आणि पलटी झाली. या वेळी महामार्गाच्या कडेला असलेल्या लोखंडी हाईट बॅरियरमुळे ही बस रस्त्यापासून खाली जाण्यापासून वाचल्याने अपघाताची भीषणता काही प्रमाणात कमी झाली.
मुबंई गोवा महामार्गांवर मंगळवारी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असतात याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली आहे. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार महामंर्गावरील शिरढोण गाव ते खारपाडा गाव या केवळ दहा किलोमीटर अंतरात क्षणभर विश्रांती हॉटेल, कसळ तलाव आणि कर्नाळा पक्षी अभय आरण्याचे प्रवेशद्वार असे तीन अपघात प्रणव क्षेत्र असून, कसळ तलाव या ठिकाणी असलेल्या नागमोडी वळणामुळे या ठिकाणी होणार्या अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे अपघात कमी करायचे असल्यास या ठिकाणी असलेली वळणे काढून टाकणे गरजेच असल्याने महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करणार्या सोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती देखील या वेळी ठाकूर यांनी दिली. मात्र आपल्या पत्रव्यवहाराची कोणत्याही प्रकारची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बहुतांश अपघात चालकांच्या चुकांमुळे
आता पर्यत घडलेल्या अपघाताच्या घटना चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अतिवेग, मद्यापान करून वाहने चालविणे, सिग्नलसह इतर नियमांचे उल्लघंन करणे, झोप येत असतानाही वाहन चालवल्याने अपघात होत आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी पोलिस रस्ता सुरक्षा वर्षभर जनजागृती केली जात आहे.मात्र या कडे दुर्लक्ष केले जाते.तर मार्गांवर अपघात रोखण्यासाठी योग्य उपाय योजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच अपघातांची भीषणता वाढताना दिसते.