खासगीकरण धोरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय बँकाच्या खासगीकरणाच्या विरोधात रत्नागिरी शहर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत रत्नागिरीतील 500 नागरिकांनी आपला स्वेच्छा सहभाग नोंदवत स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

केंद्र शासनाच्या बँक खाजगीकरण भुमिकेला बँक एम्प्लाईज संघटनेचा विरोध आहे. या विरोधाची केंद्र सरकारला जाग यावी, यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. यावेळी बँक एम्प्लाईज संघटनेचे विनोद कदम, विनोद आठवले, जीवन वेल्हाळ, भाग्येश खरे, मनोज लिंगायत, अभिजित प्रभू तथा अन्य पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version