सिराजच्या सात धावा कामी

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी (दि.9) पाकिस्तानविरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे भारतीय संघाने सुपर-8 मध्ये जागा मिळवण्यासाठी भक्कम दावेदारी ठोकली आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघासाठी प्रत्येक धाव महत्त्वाची ठरली, याचीच आठवण सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने करून दिली आहे. भारताकडून 11व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद सिराजने 7 चेंडूत नाबाद 7 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 19 षटकात 119 धावांवर सर्वबाद झाला होता. त्याच्या या 7 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्याबद्दल सिराजने आनंद व्यक्त केला आहे.

Exit mobile version