बेलदार समाजाचे प्रश्‍न सोडवा

अध्यक्ष राजू साळुंखे यांची मागणी

| खारेपाट | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्यातील भटके विमुक्त बेलदार समाजाचे प्रश्‍न विद्यमान शिंदे सरकारने सोडवावेत, अशी मागणी समाज अध्यक्ष राजू साळुंके यांनी केली आहे. नुकताच झालेल्या अखिल भारतीय बेलदार समाजाच्याबुलढाणा जिल्ह्यात अखिल भारतीय बेलदार समाजाचे कुलदैवत-आदीशक्ती कान्हुसती माता देवस्थान श्री क्षेत्र पान्हेरा खेडी ता. मोताळा जि.बुलडाणा येथे झालेल्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.

गेली 50 वर्ष अनेक राजकीय मंडळींनी निवडणुकीत बेलदार समाजाच्या वापर करून घेतला मात्र समाजाचे प्रश्‍न योग्य त्या प्रकारे सुटले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या सर्वांच्या सहकार्याने प्रश्‍न सुटतील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर प्रश्‍नाबाबात मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर चर्चा करून सदरचे प्रश्‍न सोडविले जातील, असे ते म्हणाले. मेळाव्यास आ. संजय गायकवाड, विजयराजे शिंदे, गोविंदराजे गुंजाळकर, अनिल पवार, दत्ताराम मोहिते, भानुदास जाधव, युवराज मोहिते, नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने अनेक मागण्यांचा उहापोह केला. मेळाव्याला रायगड जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील बेलदार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version