| खारेपाट | वार्ताहर |
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील भटक्या – विमुक्त बेलदार समाजाचे प्रश्न सोडून समाजाला न्याय मिळवून द्यावा असे मत भा.ज.प. भटक्या- विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक राजू साळूंके यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत चोंढी येथे व्यक्त केले.
पुढे म्हणाले की गेली अनेक वर्षे बेलदार भटक्या – विमुक्त समाजोच प्रश्न प्रलंबित आहेत मात्र असून योग्य त्या प्रमाणात सुटले नाहीत मात्र विद्यमान सरकार बेलदार भटक्या- विमुक्त समाजाला न्याय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. उच्च शिक्षणासाठी शासनाने योग्य तो निधी दिली पाहिजे आणि बेलदार भटक्या समाजाच्या सदस्याची शासनाच्या विविध महामंडळावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच 60 वर्षांवरील माता भगिनींना शासनाच्या विविध आर्थिक योजनांचा लाभ मिळावा. इतर राज्यांप्रमाणे भटक्या बेलदार समाजाला एस.टी. मध्ये आरक्षण मिळावा यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न व्हावेत. रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यात भटका बेलदार समाज पसरलेला आहे. त्यांची भटकंती थांबून त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे तसचे त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत. अशी समाजाकडून मागणी होत आहे.