। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यांच्या मागण्या योग्य असून शेकापने एसटी कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. तसेच त्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. संपाला आठ दिवस उलटून गेले असून कर्मचार्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.
कोणताही सण असो, एसटी कर्मचारी त्यांचे काम चोख बजावतात. ऐन सणासुदीच्या काळात कामावर जातात. मात्र त्यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सध्याच्या परिस्थितीत खासगी कंपनीमध्ये जास्त पगार मिळतो. त्यामुळे कर्मचार्यांची मागणी योग्य आहे. शेकापसह अनेक पक्षांनी संपाला पाठींबा दिलेला आहे, असे ही ते पुढे म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येक आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. सरकारने कर्मचार्यांवर अन्याय न करता त्यांना सरकारी सेवेत घ्यावे, अशी मागणीही माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.