शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन

| उरण । वार्ताहर ।
शासकीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्र राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पट संख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सदर निर्णय त्वरित मागे घेण्या बाबत मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड उरण-रायगड यांनी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरुषोत्तम खेडेकर, मनोज आखरे, समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जितेश पाटिल, पनवेल तालुका महानगर अध्यक्ष चेतन मुंडकर, उरण तालुका उपाध्यक्ष चंदन कडू, उरण तालुका महासचिव साहिल कडू, उरण तालुका संघटक अमोल पाटील, भावेश शेळके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version