। कर्जत । प्रतिनिधी ।
विद्यार्थी सेना बळकटीकारणासाठी मनसेने कोकण संवाद दौरा सुरू केला आहे. या दौर्यास कर्जत तालुक्यातून सुरुवात करण्यात आली. यश सरदेसाई आणि प्रशांत कानोजिया हे दूत म्हणून काम पाहत आहेत.
कार्यक्रमाला मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा साचीव जे. पी. पाटील, तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, विद्यार्थी सेना सचिव प्रसन्न बनसोडे, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अदिती सोनार, महिला तालुका अध्यक्ष आकांक्षा शर्मा सावंत, नगरसेवक हेमंत ठाणगे, तालुका सचिव अक्षय महाले, शहराध्यक्ष समीर चव्हाण, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक उपस्थित होते. श्री छत्रपतींच्या रायगडातून हा संवाद दौरा सुरू केला असल्याचे यावेळी कानोजिया यांनी म्हटले आहे.