आ.जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा पासपोर्ट कार्यालय सुरु करावे यासाठी आ. जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जयंत पाटील यांनी सात जून 2022 रोजी नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन अलिबाग येथे जिल्हा पासपोर्ट कार्यालय सुरु करावे, अशी मागणी करणारे पत्र सादर केले होते.


रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणाऱ्यांना पासपोर्टसाठी ठाणे येथे जावे लागत असे, तो त्रास कमी करावा यासाठी अलिबाग येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल केंद्र सरकारने घेवून अलिबाग येथे कार्यालय सुरु केले.

Exit mobile version