दहा महाविद्यालयांनी सहभाग, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ङ्गस्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंजफ स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत पनवेल परिसरातील दहा महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून या संकल्पना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात राबवल्या जाणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महापालिका हद्दीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी, तसेच स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती होण्याकरिता महापालिकेकडून विविध कार्यक्रम राबण्यात येत आहेत. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंजस्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 10 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धेतील विजेत्यांनी तयार केलेले प्रकल्प केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये पाठवण्यात येणार आहेत.
प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यावर भर
पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेजने स्वच्छता हर कदमम हे स्वच्छतागृहांचे निरीक्षण करणार्या पचे सादरीकरण केले. तसेच सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कॉटन बॅग व्हेण्डिंग मशिन आणि प्लास्टिक बाटल्यांचे पुनर्वापर करून पेव्हर ब्लॉक तयार करणे, 3ठ पनवेल टिमने प्लास्टिक आईसी प्लिकेशन सादर केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे प्रकल्प शहराच्या स्वच्छतेमध्ये तसेच प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यामध्ये उपयोगी पडणार आहेत.