। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय लष्कराने जम्मूजवळ पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानची फ्रंटलाईन पोस्ट आणि दहशतवादी लाँच पॅड भारताने नष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, जिथून ट्यूब लाँच ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत होते. ते लाँच पॅड भारताने उद्ध्वस्त केले आहेत. जम्मू काश्मीर लगतच्या सीमेजवळ पाकिसातने हे लाँच पॅड तयार केले होते.
पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री 26 शहरांवर ड्रोन हल्ला करण्याची तयारी करण्यात आली. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमपुढे ड्रोन आणि मिसाईल टिकली नाहीत. भारताच्या 26 शहरांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. हवेतच ड्रोन आणि मिसाईलचा धुव्वा उडवण्यात आला. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील रहिवाशी भागांना लक्ष केले. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतावून लावले.
पाकिस्तान लष्कराच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ दहशतवाद्यांनी हे लाँच पॅड्स तयार केले होते. भारताने पाकिस्तानविरोधात जोरदार कारवाई केली. केवळ हे लाँच पॅडच उद्ध्वस्त करण्यात आले नाही, तर LoC वर होणारी शेलिंग, उखळी तोफांचा तळसुद्धा नष्ट करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.