| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात गेली चार दिवसांपासून महावितरण कंपनीची वीज प्रवाह खंडित होण्याची परंपरा सुरू आहे. त्यात महत्वाचे अडथळे हे माथेरानमधील मलनिःसारण प्रकल्प यांच्या वाहिन्या अडचणीच्या ठरत आहेत. दरम्यान, वीज खंडित होत असल्याने माथेरान शहरातील प्रमुख वाहतूक व्यवस्था असलेल्या ई-रिक्षा या चार्जिंग होण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
माथेरान शहरातील वीज खंडित होण्याची परंपरा गेल्या चार दिवस सुरू आहे. महावितरण कंपनीला माथेरानमधील फॉल्ट सापडत नसल्याने शहरात काही भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. तर काही भागात वीज पुरवठा खंडित होत आहे आणि त्यामुळे माथेरानमधील सर्व व्यवहार ठप्प होत आहेत. शहरात सुरू असलेल्या मलनिःसारण प्रकल्पाचे काम मागील वर्षापासून सुरू आहेत. त्या प्रकल्पाचे वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्या खोदकामात महावितरणच्या अनेक वाहिन्या या तोडल्या गेल्या आहेत. त्या आता अडचणीच्या ठरत असून चार दिवसांपासून महावितरण कंपनीला वीज खंडित होण्याचे फॉल्ट आढळत नाहीत. त्यामुळे ही अडचण महावितरण कंपनीसाठी अडथळा ठरत आहे.
महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित होत असल्याने ई-रिक्षा चार्जिंग होत नाहीत. त्याचवेळी विजेचा दाब कमी दाबाने होत आहे. ई-रिक्षा चार्जिंग करताना ओव्हलोड आणि अंडर लोड प्रोटेक्शन आणि प्रोटेक्शन सिस्टीमची सोय केली नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यात ई-रिक्षा चार्जिंग पॉईंट आणि वायरिंग ही वीज नियमानुसार कशी असावी याबाबत मी सुनिल शिंदे सर व ई-रीक्षा यांच्या मिटिंगमध्ये अनेक वेळा सांगितले आहे. परंतु, त्या सूचनेची कोणीही दाखल घेतली नाही आणि वीज पुरवठा बाबत समस्या निर्माण झाली आहे.