| रेवदंडा | प्रतिनिधी |
कोजागिरीची नव्या पौर्णिमेच्या निमित्ताने चौल मधील भाताच्या कणसाचे तोरण मातोश्रीच्या दारी बांधण्यात आले. गेले पंचवीस वर्षे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे मातोश्रीच्या दारी चौलचे भाताचे कणीसाचे तोरण बांधत आहेत.
चौलच्या भाताच्या कणीसाचे तोरण बांधण्याची परंपरा 1998 सालापासून स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या आज्ञेने करण्यात आली होती. ती परंपरा आजतागायत सुरेंद्र म्हात्रे यांनी जपली आहे. हे तोरण दसऱ्याच्या मुर्हूतावर मातोश्रीच्या दारी बांधले जात असे; परंतु दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा भव्य मेळावा असल्याने हे तोरण कोजागिरीच्या नव्या पोर्णिमेला मातोश्रीच्या दारी बांधण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विभाग प्रमुख मारूती भगत, पेण उपतालुका प्रमुख चेतन मोकळ, उपकार खोत, राजू शेवणईकर, सुनिल घरत, बाळू वर्तक, अल्पेश ठाकूर, राकेश काठे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी चौलच्या भाताचे तोरण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केले.






