मुलीच्या प्रेमविवाहामुळे पित्याने कुटुंबच जाळले

। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
मुलीने इच्छेविरोधात लग्न केलं म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि चार नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांना जिवंत जाळलं. मुलीच्या प्रेमविवाहाला आरोपीचा विरोध होता आणि त्या रागातून त्याने हे कृत्य केलं. या घटनेत केवळ आरोपीचा जावई बचावला असून इतर सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Exit mobile version